Friday, 9 October 2015

नाही जन्मली मुलगी तर उद्याच्या जगाला आई कुठली

             

"आई " हा शब्द नुसता ओठावर जरी आला तरी किती छान वाटत. जे आईचे  प्रेम आहे , जी आईची माया आहे ती  नुसती आई हा शब्द जरी ओठावर आला तरी अनुभवायला मिलते.
          आपल्या सुखात, आपल्या दुःखात  आई हा शब्द ओठावर आल्या वाचून  रहत नाही. का आपल्या बाबा किंवा अजुन कुठवल्या नातेवाईकांचा  नाव येत नसेल? आपली आई जरी आपल्या सोबत नसली तरी का आईलाच आपण हाक मारतो. कारन या जगत आईच्या मएयेवढी मोठी कुणाचीच माया नाही आणि आई पेक्षा  मोठी माया असुहि शकणार नाही.
         
                                  " सुख असो व दुःख  पाठीशी तू राहते
                                         कधी  कोन्या कमाची परतफेड नातू मागते
                                               तरीही या दुनियेत आई आज असही होते      
                                                     की इथे मुलीलाच गर्भामध्ये मारल्या जाते. "

खर आहे एक मुलगी जेव्हा  जन्मते ती  मोठी होते आणि ती  जेव्हा  आई होते तेव्हा त्या  आई च किती कौतुक 
केल्या  जाते .  पण आज परिस्तिथि जरा बदलली आहे.  आई होणार असेल तर मुलालच जन्म दिला  पाहिजे,  आई होणार असेल तर मुलालच जन्म दिला  पाहिजे.... पण लोकहो जर मुलच जन्माला आली तर एक दिवस असा येईल की मूल जन्माला घालयला आइच शिल्लक राहणार नहीं. आज हे ऐकायला आपल्याला कही वाटणार नहीं कदाचित, पण आज जार स्त्रिभ्रुणहत्या  थांबवल्या गेल्या नहीं तर तो दिवस दूर नसेल जेव्हा मुलगा जन्माला घालायला  आईंच शिल्लक राहणार नाही.

                         स्त्रिभ्रुणहत्येची कारने अनेक आहेत, कुठे आम्हाला  मुलगाच  हवा हा अट्टहास असतो, तर 
आर्थिक परिस्थितिमुले मुलीच पालन-पोषण आणि तिच्या लग्नाचा खर्च झेपावणार नाही याची कालजी, कुठे 
सामाजिक व शारीरिक असुरक्षतेचा प्रश्न असतो तर कुठे मुलगी अविवाहित राहिल्यास कुटुम्बला कलंक लागेल अशीभावना आणि या सर्वांना सोपि वाटली ती  गर्भलिंग निदानाची सहज व परपरवडण्याजोगी उपलब्धता.वैद्यकीय क्षेत्रात जरी या सोई चांगल्या गोष्टींसाठी वापरल्या जातात पण याचा कुठेतरी दुरुपयोगच होतान्ना दिसतोच.

      विद्न्यानाचे  नवनवीन प्रयोग केले ते मापनाच, प्रयोग झालेत ते चांगल्यासाठीच पण आपला मानव जन्म नान्याला दोन बाजु अस म्हणून चांगल्या गोष्टीत वाइट शोधने आपल्याला चांगल जमते.  पण आज जर स्त्रिभ्रुणहत्या  रोखल्या नाही गेल्या, तर त्याचे किती वाइट परिणाम होतील याचा आपण विचार केलाच पाहिजे. आपल्या कडून जरी जास्त काही नाहीं करता आल तरी आपण एवढ तर नक्कीच करू शकतो, की मी  निदान माझ्या घरीतरी लिंगपरीक्षण होउ देणार नाही. आणि जर मला अस कुणी करतांना आढळल तर मी  विरोध केल्या शिवाय राहणार नाही. आपण प्रत्येकानि एवढ जरी केल तरी स्त्रिभ्रुणहत्या रोखण्यास खुप मदत होईल .

      स्त्रिभ्रुणहत्या रोखण्यासाठी आज बऱ्याच संस्था समोर आल्या आहेत. त्या  संस्थातील यवस्थापक अतोनात  प्रयत्न करात असतात, की स्त्रिभ्रुणहत्या रोखल्या गेल्या पाहिजे. आज आपण या संस्थांचा भाग जारी नसलो तरी एक आपल्या देशाचे नागरिक म्हणून आपण ही जवाबदारी स्वीककरली पाहिजे.

                                          "स्त्रिभ्रुनाला लाऊ नका कात्री
                                                    मिळणार नाही मग जन्मदात्री."


No comments:

Post a Comment